महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी सुनील जगन्नाथ शिंदे (पाटील)यांनी सेंद्रिय खताच्या मदतीने व मिश्रा साहेबांच्या सल्ल्याने एकरी शंभर टनाचे उत्पन्न घेऊन तालुका भर आपले नाव केलेले आहे. सुनील जगन्नाथ शिंदे( पाटील) हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत व शेतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन काढतात. मक्याच्या व वांग्याच्या प्लॉटमध्ये भरघोस उत्पन्न घेतलेले आहे, मुलांची व पत्नीची शेतीमध्ये त्यांना भरपूर मदत मिळते, व वडील माझी पोलीस पाटील असून ते पण त्यांना अधून मधून सल्ला देत असतात .सुनील पाटील राजकारण बघत बघत चांगल्या प्रकारे शेती करतात व त्यामधे त्यांचा कामावरील गडी राजू सपकाळ यांचे ऊस भिजवण्यामध्ये मोठे योगदान आहे.
अशाप्रकारे रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचा वापर करून त्यामध्ये त्यांनी सिलिकॉनचा जास्त प्रमाणात वापर केला आहे. त्यांनी दाखवून दिले की सेंद्रिय खतांनी सुद्धा एकरी शंभर टन उत्पन्न निघु शकते त्यांनी आपल्या ऊसाला चार डोस केले आहे. भेसळ डोज ,चडी,थाप आणि बांधणी दिले आहे .दोन वेळा पाण्या द्वारे साहेबांच्या सल्ल्याने खते सोडलेले आहे व उसाला दोन फवारण्या केलेल्या आहेत .जवळपास ४३ते ४८कांड्यावर ऊस गेलेला आहे. त्यांचा एकूण पाच एकर ऊस आहे व एकरी खताचा खर्च 25हजर ते28हजार इतका झाला आहे. असे सुनील पाटील यांनी सांगितले. ते सेंद्रिय खते वापरून व योग्य सल्ल्याने अतिशय समाधानी आहेत व लोकांना वापरण्यास सांगत आहेत व सल्ला घेण्यास सांगत आहेत. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ,शेतीचे योग्य पद्धतीने नियोजन केले व योग्य मार्गदर्शन लाभले आणि ते मार्गदर्शन आपण शंभर टक्के ऐकले तर तर निश्चितपणे शेती परवडू शकते हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. १००टन उत्पन्न निघण्यासाठी त्यांनी ८६०३२ बेण्याची निवड केली , एकदा उसाची पाचट काढली,15दिवसातून एकदा मोकळे भिजवले व सांगितलेले मार्गदर्शन योग्य पद्धतीने हाताळले अशा पद्धतीने शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवून एकरी शंभर टनाचे उत्पन्न पार केले, त्यांनी मिश्रा साहेब यांचे खूप खूप आभार मानले.
0 Comments