#Yavat: उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने अतोनात नुकसान होत आहे - आमदार राहुल कुल


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
थकीत वीजबिलापोटी राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीज बेधडकपणे खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे, अतिवृष्टी,अवर्षण आदींनी राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाच ऐन उन्हाळामध्ये शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे, शेतीपंपांची अवास्तव बिल आकारणी, लाखो रुपयांची थकबाकीची बिले देऊन सक्तीच्या वीज बिल वसुलीने बळीराजाचा अडचणीत येत आहे. 

या संदर्भात विरोधी पक्ष नेते माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व भारतीय जनता पार्टीच्या इतर विधानमंडळ सदस्यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली परंतु शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम थांबविण्याबाबत व शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिला संदर्भात कुठलाही ठोस उपाय, दिलासा न देणाऱ्या जुलमी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आमचे नेते  माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात विधानभवन परिसरात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम