Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:पत्रकार बांधवांमुळेच लोकशाही टिकेल - राजकुमार हिवरकर पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क -


संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने पत्रकार दिन शिवसेना भवनावर साजरा करण्यात आला. 

शिवसेनेची माळशिरस तालुक्याची सामाजिक उपक्रमाची वाटचाल चौफेर चालू आहे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे संस्थापक असणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी केली. 
यावेळी पत्रकार बांधवांचा गुलापुष्प व शिवसेनेचे वतीने गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला.


समाजातील वंचित बहुजन सुशिक्षित असुशिक्षित दिन दलित महिला पुरुष वंचित घटकांना न्याय द्यायचं काम पत्रकारांच्या लेखणीतून होत असतं पत्रकाराने सामाजिक कामात योगदान दिल्याने बऱ्याचदा रोशास सामोरे जावं लागतं परंतु पत्रकारिता जर लोकशाहीच्या स्तंभाला अभिप्रेत अशी झाली नाही तर समाजातील वरील घटकांना न्याय मिळू शकत नाही मी माझ्या शिवसेनेच्या सतरा अठरा महिन्याच्या कालखंडामध्ये पत्रकार बांधवांच्या सामाजिक योगदानामुळेच शिवसेनेने राबवलेले सर्व सामाजिक उपक्रम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकलो त्यामध्ये दिवाळीच्या निमित्त वाटप झालेले दाळ असेल नातेपुते ग्रामीण रुग्णालयाला मिळवून दिलेली अंबुलन्स असेल 38 हजार माता भगिनींची केलेली तपासणी असेल एक लाख वीस हजार शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यावर केलेला मोफत औषध उपचार असेल नारी शक्तीचा सन्मान म्हणून बचत गटातील महिलांना 27 दुकान रेशन दुकान उपलब्ध करून दिलेली योजना असेल 6150 माळशिरस तालुक्यातील रुग्णांना मोफत ऑपरेशन करून त्यांना मिळवून दिलेल्या न्याय असेल नातेपुते ग्रामीण रुग्णालयात बांधलेली संरक्षित भिंत असेल त्याचबरोबर नातेपुते ग्रामीण रुग्णालयात एक कोटी 25 लाख रुपयांचा खर्चून पुणे मुंबईच्या धर्तीवर बांधलेला ऑपरेशन थेटर असेल ते सगळं शक्य झालं ते माझ्या पत्रकार बांधवांमुळे झालं समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देऊ शकतो ते  पत्रकार बांधवांमुळे देऊ शकतो प्रशासनातील उनिवा त्याविरोधातू केलेलं काम प्रसारमाध्यमांनी घेतली दखल यामुळे शिवसेना ही लोकांच्या घराघरात पोचली शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण याही पुढे जाऊन माळशिरस तालुक्यात मी शिवसेनेचा तालुकाप्रमुख म्हणून शंभर टक्के समाजकारण करून पक्ष सर्वसामान्यांचा हाकेचा पक्ष बनला हे फक्त आपल्या सर्वांच्या योगदान यामुळे शक्य झाले भविष्यात सुद्धा शिवसेना सामाजिक उपक्रमात राहील. असे मत शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी पत्रकार आनंदराव जाधव, गुगरदरे काका, पिसे सर, समीर सोरटे ,अभिमन्यू आठवले, अमित सोरटे, विलास भोसले, श्री राम भगत महाराज,  मह्मणे सर,हनुमंत माने, सुनील गजाकस,  बापू बाविस्कर, शोभा वाघमोडे, तानाजीराव वाघमोडे, सुनील  ढोबळे,अनिल पवार इ.पत्रकार उपस्थित होते.तसेच पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील तालुकाप्रमुख प्रमोद चिकणे सर प्रभाग तेरा चे प्रमुख सोनू लांडगे, अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे, पिराळे शाखाप्रमुख आकाश खिलारे ,जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत ,सचिव माऊली देशमुख, पप्पू मोहिते, दत्ता बोडरे, विजय सरवदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments